पनवेल पालिकेकडून १५ फेब्रुवारीपर्यंत पीएम-एसवायएम पेन्शनची नोंदणी सुरू

कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आयुक्तांचे आवाहन


पनवेल : महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना”साठी विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना देण्यात येत असून यामध्ये रिक्षाचालक, फेरीवाले, छोटे व्यापारी, घरगुती कामगार,शेती कामगार, बांधकाम कामगार, हातमाग कामगार आदींचा समावेश आहे. लाभार्थ्यांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच ईपीएफओ/एनपीएस/ईएसआयसीचे सदस्य नसणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वैवाहिक जोडीदारास 15 हजार रूपये पेन्शन प्रति महिना मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन विशेष नोंदणी मोहिमेसाठी प्रभाग निहाय विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. संबंधित तारखांना सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत ही शिबिरे सुरू राहणार आहेत. लाभार्थ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



विशेष नोंदणी मोहिमेसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक


२७, २८ जानेवारी २०२६ कळंबोलीतील काळभैरव मंगल कार्यालय, २९,३० जानेवारी २०२६ कामोठे प्रभाग कार्यालय, ३,४ जानेवारी २०२६ खारघरमधील सेक्टर ७ येथील प्राईड सोसायटी,५,६ जानेवारी २०२६ नावडे प्रभाग कार्यालय,१०,११ जानेवारी पनवेल येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या