धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव


नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील वेगवेगळ्या उपनगरांच्या खाडी किनारी तयार करण्यात आलेल्या धारण तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने अखेर युद्धपातळीवर आखणी सुरू केली आहे. शहरातील ११ धारण तलावांना गेल्या काही वर्षात २२७ हेक्टर इतक्या परिसरात तिवरांच्या जंगलांचा वेढा पडला असून खारफुटी तोडण्यास कायद्याने बंदी असल्याने तलावांमधील गाळ दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाने २२७ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या ८० हजार खारफुटींच्या कत्तलीचा विशेष प्रस्ताव तयार केला असून वन विभाग आणि न्यायालयीन मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


नवी मुंबई शहर मुंबईप्रमाणे समुद्रसपाटीपेक्षा खाली वसले आहे. मुसळधार पावसात मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हा अनुभव लक्षात घेऊन सिडकोतील तत्कालीन नियोजनकारांनी नवी मुंबईची उभारणी करत असताना प्रत्येत उपनगरांमध्ये खाडीच्या तोंडावर धारण तलावांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या धारण तलावांमध्ये मुसळधार पावसातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भरतीच्या काळात या धारण तलावांच्या तोंडावर तयार करण्यात आलेले ‘फ्लॅप गेट’ भरतीच्या पाण्याच्या दबावाने आपोआप बंद होतात. या काळात धारण तलावांमध्ये पाणी साठवून ठेवले जाते. भरती ओसरताच दरवाजे उघडतात आणि तलावांमधील पाणी पुन्हा खाडीच्या दिशेने आपोआप निघून जाते.


धारण तलावांना खारफुटीचा वेढा


गेल्या काही वर्षांत शहरातील ११ धारण तलावांना खारफुटीचा वेढा पडला आहे. खाडीतील खारेपाणी या धारण तलावात भरती-ओहटीच्या काळात येत असते. यामुळे या धारण तलावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर खारफुटी तयार झाली आहे. धारण तलावांच्या एकूण २२७ हेक्टरच्या क्षेत्रफळात ८० हजारांहून अधिक खारफुटी तयार झाल्याने धारण तलावांची सफाई जवळपास ठप्प झाली आहे. याचा फटका आता शहरातील काही उपनगरांना बसू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून सानपाडा, तुर्भे, सीबीडी यासारख्या उपनगरांमध्ये सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. वाढलेल्या गाळामुळे धारण तलावांची पाणी साठवण क्षमता कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे अभियांत्रिकी विभागाचे म्हणणे आहे. गेली अनेक वर्षे धारण तलावांची सफाई झालेली नाही. खारफुटीच्या क्षेत्रात कोणतेही काम करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या तलावांची सफाई जवळपास ठप्प झाली असून खारफुटीचे क्षेत्र वाढू लागले आहे.

Comments
Add Comment

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी