वसई-विरार पालिकेत भाजप गटनेतेपदी अशोक शेळके

विरार  : वसई-विरार महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी अशोक शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजपच्या ४३ नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत अशोक शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४३ जागा जिंकल्या असून, वसई-विरार महापालिकेत प्रथमच दमदार विरोधी पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला आहे. भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस पदावर कार्य करताना अनेक आक्रमक आंदोलने केली. तसेच विविध नागरी समस्यांना वाचा फोडून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तरुण, अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रभाग क्र. २२ मधून अशोक शेळके यांच्यासह भाजपाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे भाजपचे खासदार हेमंत सवरा, संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे, पंडित जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, महामंत्री मनोज बारोट, जोगेंद्रसाद चौबे, विजेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदाची एकमताने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अशोक शेळके यांची निवड झाली. अशी माहिती भाजप वसई-विरार जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक