केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी राष्ट्रपतींना सुपूर्द या शिफारशी स्विकारला जाणार

प्रतिनिधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वित्त आयोगाने आपला अर्थसंकल्पाविषयक अहवाल सुपूर्द केला आहे. १६ वा वित्त आयोगाच्या शिफारशी या आर्थिक अहवालाच्या आधारे स्विकारल्या जातील. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखालील १६ वा वित्त आयोग ३१ डिसेंबर २०२३ रोजी स्थापन करण्यात आला होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली या शिफारशी आधीच राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्या होत्या. वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी जी केंद्र-राज्य वित्तीय संबंधांवर सूचना वेळोवेळी देते. पनगडिया यांच्या नेतृत्वाखाली वित्त आयोगाचे सदस्य निवृत्त नोकरशहा ॲनी जॉर्ज मॅथ्यू, अर्थशास्त्रज्ञ मनोज पांडा, एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर आणि आयोगाचे सचिव ऋत्विक पांडे यांनी यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. आयोगाने या अहवालाची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही सादर केली. जरी १६ व्या वित्त आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नसला तरी, केंद्र सरकार ऐतिहासिकदृष्ट्या आयोगाच्या शिफारशी स्वीकारत आले आहे. आर्थिक २०३०-३१ पर्यंतच्या पाच वर्षांसाठी करांच्या वाटपाच्या सूत्रासंबंधी १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी, अहवाल सार्वजनिक झाल्यावर पाहण्यासारखी प्रमुख बाब असेल. २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी १५ व्या वित्त आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये (ToR) सुधारणा करण्यात आली ज्यानुसार आयोगाला दोन अहवाल सादर करणे आवश्यक होते. पहिला अहवाल २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आणि दुसरा अंतिम अहवाल २०२१-२२ ते २०२५-२६ या विस्तारित कालावधीसाठी देण्यात आला होता. परिणामी, १५ व्या वित्त आयोगाने २०२०-२१ ते २०२५-२६ या ६ वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या शिफारसी केल्या.


जम्मू आणि काश्मीर, आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर झालेल्या प्रादेशिक बदलांचा विचार करून ४१% निधी हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. तरतूदीनुसार वित्त आयोगांनी लोकसंख्या, क्षेत्रफळ, लोकसंख्याशास्त्रीय कामगिरी, वित्तीय प्रयत्न, उत्पन्नातील अंतर आणि वनक्षेत्र यांच्या भारित बेरजेच्या आधारावर केंद्रीय करांमधील राज्यांचा वाटा निश्चित केला आहे. हा मुद्दा केंद्र आणि राज्यांमध्ये, विशेषतः विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये, नेहमीच संघर्षाचा विषय राहिला आहे.


कार्यकक्षेनुसार (Terms of Reference) १६ व्या वित्त आयोगाला १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये करांच्या निव्वळ उत्पन्नाचे वितरण, तसेच अशा उत्पन्नाच्या संबंधित हिश्शांचे राज्यांमध्ये वाटप, राज्यांना सहायक अनुदान, आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांच्या वित्तपुरवठ्यावरील व्यवस्थांचे पुनरावलोकन इत्यादींबाबत शिफारशी करणे अपेक्षित होते. एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या वित्त आयोगाने, २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांच्या कालावधीत राज्यांना केंद्राच्या कर निधीपैकी ४१% वाटा देण्याची शिफारस केली होती,जी १४ व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीच्या समान पातळीवर आहे असे सांगितले जात आहे. यापूर्वी १५ व्या वित्त आयोगाची (१५ वा एफसी) स्थापना २७ नोव्हेंबर २०१७ रोजी २०२०-२१ ते २०२४-२५ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी शिफारसी करण्यासाठी करण्यात आली होती.


१५ व्या वित्त आयोगाने लोकसंख्येला १५%, क्षेत्रफळाला १५%, लोकसंख्याशास्त्रीय कामगिरीला १२.५%, वनक्षेत्र आणि पर्यावरणाला १०% आणि कर व वित्तीय प्रयत्नांना २.५% महत्त्व दिले होते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील १४ व्या वित्त आयोगाने, १३ व्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या ३२% विभाजित निधीमधील करांचे हस्तांतरण लक्षणीयरीत्या वाढवून ४२% केले होते.१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसी १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०२० पर्यंत लागू होत्या. संविधानानुसार स्थापन झालेला वित्त आयोग, केंद्र आणि राज्यांमध्ये करांच्या वाटपासाठी एक सूत्र प्रदान करतो. केंद्राने लावलेले उपकर आणि अधिभार हे विभाजित निधीचा भाग नसतात.

Comments
Add Comment

Gold-Silver Rate : आनंदवार्ता! चांदी १४ हजारांनी कोसळली तर सोन्याचा भाव १.६० लाखांच्या खाली

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली