ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला,


विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली असली तरी भाजपचा गड असलेल्या ईशान्य मुुबईत शिवसेनेची वाढलेली ताकद कमी झाली आहे. या निवडणुकीत ईशान्य मुंबईत शिवसेनेचे १२ नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता ०४वर आली आहे. तर उबाठाची संख्या ०८एवढी होती, ती वाढून ११ झाली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन कमी झाले असून उबाठाचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून या सर्व विधानसभांमध्ये ३९ नगरसेवक आहेत. त्यातील मागील वेळेस भाजप आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही संख्या १९ एवढी झाली आहे. त्यामुळे महायुतीची संख्या ०६ने कमी झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या १३ होती ती आता वाढून १५ झाली आहे, तर शिवसेनेची संख्या १२ होती होती, कमी हाेवून ०४ एवढी झाली आहे. तर उबाठाची संख्या ०८ वरून ११ एवढी झाली आहे.


विशेष म्हणजे विक्रोळीत उबाठाचा जिथे एक नगरसेवक होता, तिथे आता त्यांचे ०४ नगरसेवक झाले आहेत.


तर भांडुप आणि घाटकोपर पश्चिममधील नगरसेवकांची संख्या कायमच राहिली आहे. या दोन्ही मतदार संघात मागे प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून आले होते, ही संख्या आताही कायम आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगरमध्येही उबाठाचा एकमेव नगरसेवक होता, ही संख्या त्यांनी कायमच राखली आहे तर या मतदार संख्या शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता एकवर आली आहे.


उत्तर पूर्व मुंबई


पूर्वी


भाजप : १३, शिवसेना : १२, उबाठा : ०८,काँग्रेस : ०१, समाजवादी पार्टी : ०५


उत्तर पूर्व मुंबई


आता


भाजप : १५, शिवसेना : ०४, उबाठा : ११,काँग्रेस : ०१, एमआयएम व इतर ०८

Comments
Add Comment

राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार मुंबई : नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात

महाविद्यालयांमध्ये तब्ब्ल ५०१२ प्राध्यापकांची भरती; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण विभागातर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

मुंबई : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना

Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६