ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला,


विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली असली तरी भाजपचा गड असलेल्या ईशान्य मुुबईत शिवसेनेची वाढलेली ताकद कमी झाली आहे. या निवडणुकीत ईशान्य मुंबईत शिवसेनेचे १२ नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता ०४वर आली आहे. तर उबाठाची संख्या ०८एवढी होती, ती वाढून ११ झाली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन कमी झाले असून उबाठाचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून या सर्व विधानसभांमध्ये ३९ नगरसेवक आहेत. त्यातील मागील वेळेस भाजप आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही संख्या १९ एवढी झाली आहे. त्यामुळे महायुतीची संख्या ०६ने कमी झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या १३ होती ती आता वाढून १५ झाली आहे, तर शिवसेनेची संख्या १२ होती होती, कमी हाेवून ०४ एवढी झाली आहे. तर उबाठाची संख्या ०८ वरून ११ एवढी झाली आहे.


विशेष म्हणजे विक्रोळीत उबाठाचा जिथे एक नगरसेवक होता, तिथे आता त्यांचे ०४ नगरसेवक झाले आहेत.


तर भांडुप आणि घाटकोपर पश्चिममधील नगरसेवकांची संख्या कायमच राहिली आहे. या दोन्ही मतदार संघात मागे प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून आले होते, ही संख्या आताही कायम आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगरमध्येही उबाठाचा एकमेव नगरसेवक होता, ही संख्या त्यांनी कायमच राखली आहे तर या मतदार संख्या शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता एकवर आली आहे.


उत्तर पूर्व मुंबई


पूर्वी


भाजप : १३, शिवसेना : १२, उबाठा : ०८,काँग्रेस : ०१, समाजवादी पार्टी : ०५


उत्तर पूर्व मुंबई


आता


भाजप : १५, शिवसेना : ०४, उबाठा : ११,काँग्रेस : ०१, एमआयएम व इतर ०८

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री

Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार मुंबई : विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले

अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेच्या कारणांचा शोध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६