Ajit Pawar Passed Away : ओह शिट..! अजित पवारांचे विमान कोसळण्याआधी पायलटचे शेवटचे शब्द

मुंबई : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे. विमान कोसळण्याआधी वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उच्चारलेले “ओह शिट… ओह शिट” हे शेवटचे शब्द या अपघाताची भीषणता अधोरेखित करणारे ठरत आहेत.


उपलब्ध माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळच्या वेळेस धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे क्रमांक ११ वर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याने त्यांनी विमान पुन्हा वर घेतले. यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, मात्र धावपट्टीला स्पर्श करण्याआधीच विमानाचा तोल गेला, ते उलटले आणि जमिनीवर जोरात आदळले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

- बारामती विमानतळाजवळील परिसरात वस्ती असल्याने अनेकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान धावपट्टीपासून सुमारे १०० फूट आधीच कोसळले. विमान खाली उतरत असताना अपघात होणार, अशी भीती वाटत होती आणि तसेच घडले. धावपट्टीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
- अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही मदत करता आली नाही. काही गावकऱ्यांनी सांगितले की, स्फोटानंतर विमानाचे तुकडे उडून थेट घरांपर्यंत येऊन पडले.
- आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान आधी गावावरून गेले आणि नंतर खाली उतरताना दिसले. त्यानंतर ते धावपट्टीकडे गेले, उलटले आणि जमिनीवर आदळले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोळ उठले होते.


विमानातील प्रवासी


१. उपमुख्यमंत्री अजित पवार
२. मुंबई पीएसओ हवालदार विदीप जाधव
३. पायलट कॅप्टन सुमित कपूर
४. कॅप्टन शांभवी पाठक
५. पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट



Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी