पोलादपूर तालुक्यात लोहारे गटात चौरंगी लढत

अन्य पाचही जागांवर थेट लढती; वाटाघाटीनंतर माघार


जदसेचा भाजप-राष्ट्रवादी युतीला जाहिर पाठिंबा


पोलादपूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या चार गणांमध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या लोहारे गटात चौरंगी लढत होणार असून कापडे बुद्रुक गटासह पंचायत समितीच्या चारही गणांमध्ये थेट लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कापडे बुद्रुक ५८ जि.प.नामाप्र गटामध्ये डॉ. नीलेश कुंभार (शिवसेना), अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजप) अशी थेट लढत होणार आहे, तर लोहारे ५९ जि.प. सर्वसाधारण गटामध्ये चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (भाजप), अ. रझाक करबेलकर (काँग्रेस), कृष्णा कदम (अपक्ष) अशा ४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.


पोलादपूर पंचायत समितीच्या माटवण ११५ नामाप्र महिला पंचायत समिती गणामध्ये शेकापतर्फे साक्षी कांबळेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर अशी थेट लढत होणार आहे. कापडे बुद्रुक ११६ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिल दळवी विरूध्द राष्ट्रवादीचे अनिल मालुसरे अशी थेट लढत होणार आहे. लोहारे ११७ सर्वसाधारण महिला गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिता भिलारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युगज्ञा उतेकर अशी थेट लढत होणार आहे. कोतवाल बुद्रुक ११८ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अविनाश शिंदे विरुद्ध भाजपतर्फे सुरेंद्र चव्हाण, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना जनता दल सेक्युलरचे उमेदवार भगवान साळवी यांनी पक्षाला केंद्रसरकारमध्ये मंत्रीपद असल्यामुळे पाठिंबा जाहीर केला.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित