Ajit Pawar Passed Away : 'माझा मोठा भाऊ हरपला' - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "माझ्या मनात माझा मोठा भाऊ हरपला अशी भावना आहे," अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झालं.


काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? 


"मनाला चटका आणि वेदना देणारी ही घटना आहे. अजितदादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कोणी केला नसेल. दादा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड व्यक्तिमत्व होतं त्यांचं.  चूक त्याला चूक म्हणणारे ते असले तरी ते मनाने अतिशय निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं आहे.  अजितदादा यांना काम करताना वेळेच भान नसायचं. सकाळी ६ वाजता देखील ते लोकांना भेटायचे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते, त्यामुळेच मला माझा मोठा भाऊ हरपला असं वाटत आहे. "







बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तसेच या अपघातात विमानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या