CM Fadnavis Dy CM Eknath Shinde Meet Sunetra Pawar in Baramati : सुनेत्रा वहिनींनी जोडलेले हात अन् मुख्यमंत्री-राज्यपालांची स्तब्धता; बारामतीतील ते दृश्य पाहून महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. वित्त व नियोजन मंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळणाऱ्या एका व्हिजनरी नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी दादांना अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना आपले अश्रू अनावर झाले होते. दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण बारामती त्यांच्या दुःखात सहभागी झाली आहे.



मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांत्वन


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बारामती गाठली. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी समोर आलेली छायाचित्रे मन सुन्न करणारी होती; हात जोडून उभ्या असलेल्या सुनेत्रा वहिनींचे सांत्वन करताना दोन्ही नेत्यांनाही आपले दुःख आवरता आले नाही. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्मभूमीत, म्हणजेच बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीसाठी स्वतः पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर बारामतीकडे लोटला आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या