Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण विमान अपघातामागील प्राथमिक कारण स्पष्ट झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी असलेली कमी दृश्यमानता (लो व्हिजिबिलिटी) हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मंत्री नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अजित पवार यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले असता परिसरात दाट धुके होते. या वेळी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर वैमानिकाने धावपट्टी दिसत नसल्याचे कळवले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमानाने हवेतच एक फेरा (गो-अराउंड) मारला.

यानंतर दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची माहिती दिल्यानंतर एटीसीने लँडिंगची परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी दृश्यमानता केवळ सुमारे ८०० मीटर इतकी मर्यादित असल्याने वैमानिकाचा अंदाज चुकला असावा. परिणामी, विमान धावपट्टीच्या जवळील शेतात कोसळले आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, संपूर्ण प्रकरणाची अत्यंत पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री नायडू यांनी दिले आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री के. राममोहन नायडू यांनी बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट ...आणि नंदनवनमध्ये फुलल्या कलाप्रेमींच्या गप्पा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्याने आज एका वेगळ्या

मुंबई-मार्सेलिस दरम्यान उभारणार नवा आर्थिक 'सेतू' - महाराष्ट्र आणि फ्रान्सच्या 'पाका' प्रांतात सामंजस्य करार

वीर सावरकरांच्या स्मृतींनी पावन झालेल्या भूमीशी जोडले जाणार नाते मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या

मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा अहवाल अद्याप सीलबंद - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; अहवाल वाचल्यानंतर दोषींविरोधात कठोर पावले उचलणार

मुंबई : पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून त्याचे वाचन

नवी मुंबई, नवी क्षमता - जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन केले. मुंबई :

राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार -- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक संपन्न मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक मत्स्य व्यवसाय व बंदरे

मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांची पॅरापेट कोसळल्याच्या घटनेनंतर मेट्रो लाईन ४ साठी थर्ड पार्टी ऑडिटची मागणी

एमएमआरडीए आणि टी-वार्ड अधिकाऱ्यांसह एलबीएस रोड पट्ट्यावर आमदार मिहिर कोटेचा यांची संयुक्त पाहणी पॅरापेट