Ajit Pawar Passed Away : पंतप्रधान मोदींसह अमित शहा यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बुधवार २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क करून चर्चा केली. यावेळी त्यांनी बारामतीत झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती घेतली.  या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.


आज सकाळी ८:४८ वाजता अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाणारे लिअर जेट ४५ विमान, व्हीटी-एसएसके, बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना धावपट्टीवरून घसरले आणि हा भीषण अपघात घडला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे दोन सदस्य आणि दोन क्रू मेंबर्ससह विमानात उपस्थित होते आणि या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला.







जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार पुणे जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी बारामती येथे जात होते.  बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.







हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर