नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित


मुंबई : जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो लाईन ८ चा मार्ग उभारण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.

'मेट्रो लाईन ८'ची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून, त्यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यामध्ये ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे, तर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंतचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किलोमीटर इतके ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

........
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती

समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत आणि कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या मंजुरीची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
.......
नाशिक शहर परिक्रमा मार्ग गतिमान

- याच बैठकीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
- तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे–कोनसरी–मूळचेरा–हेदरी–सुरजागड या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा असणार असून, त्यामुळे औद्योगिक आणि खनिज वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता