१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी


मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन


मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद


मुंबई : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत २०० गुणांपैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.


या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.


ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन, वेळबद्ध सेवा, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) तसेच बंदरे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, ही कामगिरी इतर शासकीय संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.



मंत्री नितेश राणे यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन


१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे खात्याचे मंत्री श्री नितेश राणे यांनी सदर विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू

Water Metro: मुंबईच्या समुद्रात ८ मार्गांवर धावणार 'वॉटर मेट्रो' - मंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणार मुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी

Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला

Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची

२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित

अल्पसंख्याक प्रमाणपत्र घोटाळ्यात मंत्रालयातील उपसचिव रडारवर - अनियमितता करणाऱ्यांची गय नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक