Chitra Wagh : 'आमच्याकडे संविधनाचं शस्त्र आहे ...' अंजली भारतीच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या

गायिका अंजली भारती यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "आमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधनाचं शस्त्र आहे, कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे." अशा शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिलं आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.


काय म्हणाल्या चित्रा वाघ ?


अंजली भारती नावाच्या बाईचा आताच एक व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करा.. अशी चिथावणी देणं.. ती सुद्धा एका बाईने? अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. अशी भाषा मानसीक विकृती असून या बाईवर आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. पुढे त्या म्हणाल्या; श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद| जय महाराष्ट्र| जय भीम.





नेमक प्रकरण काय ?


भंडारा येथील भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर खासदार संजय निरुपम यांनी हा व्हिडिओ शेअर करत टीका केली होती. या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच चित्रा वाघ यांनी गायिका अंजली भारती आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती