शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाप्रमाणेच राज्याच्या विकासाला गती देणारा शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा असेल.


स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर जनतेच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न यांचा सर्वांगीण विचार करून एमएसआरडीसीने शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन तयार केला आहे. आधीचा ८४० किमीचा महामार्ग आता ८५६ किमीचा झाला आहे. आधी १२ जिल्ह्यांतील ३५० गावांतून जाणार असलेला हा मार्ग आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार आहे. या महामार्गामुळे प्रवास वेगाने होईल. मालवाहतूक करणे सोपे होईल.


शक्तिपीठ महामार्गात आता सातारा या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.


आधी जुन्या प्लॅननुसार १४६ गावांतील मोजणी झाली होती. यातील आवश्यक ती माहिती वापरली जाईल आणि जिथे गरज असेल तिथे पुन्हा मोजणी घेतली जाईल तसेच उर्वरित गावांतही जमीन मोजणीची कामं वेगाने केली जातील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. जमीन मोजणी पूर्ण केल्यानंतर कायद्यानुसार योग्य तो मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Comments

Ankush Shahane    January 28, 2026 10:51 AM

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून कुठल्या गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्या गावाची नावे पाहिजे

Bibhishan Kamble    January 26, 2026 09:45 PM

गावांची नावे, ज्या गटातून रस्ता जातो तो गट नंबर, हे सविस्तर सांगा आम्ही शेती देण्यास तयार आहोत

Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर