अलवारमध्ये उभारला जाणार पहिला जैविक उद्यान प्रकल्प

जयपूर : राजस्थान आपल्या वन्यजीव पर्यटनात आणखी एक महत्त्वाची भर घालणार असून, अलवार जिल्ह्यातील कटी घाटी परिसरात अत्याधुनिक जैविक उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वन्यजीव संवर्धन, पशुसेवा आणि पर्यटन या तिन्ही बाबी एकत्र आणणारा असून, पूर्ण झाल्यानंतर तो राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) पहिला असा जैविक पार्क ठरणार आहे.


प्रस्तावित उद्यान कटी घाटी व जैसमंद दरम्यान सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात उभारले जाईल. यापैकी सुमारे ३० टक्के भाग चिड़ियाघरासाठी, तर उर्वरित ७० टक्के भाग हरित क्षेत्र म्हणून राखला जाणार आहे, जेणेकरून नैसर्गिक अधिवास जपला जाईल. येथे ८१ प्रजातींचे ४०० हून अधिक वन्यजीव ठेवण्यात येणार असून, सिंह, वाघ, चित्ता तसेच आफ्रिकेतून आणले जाणारे जिराफ हे प्रमुख आकर्षण असतील.


या उद्यानाची खासियत म्हणजे एकाच परिसरात शेर सफारी, बाघ सफारी आणि शाकाहारी प्राण्यांची सफारी उपलब्ध होणार आहे. तसेच, गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर हाय-टेक पशु रेस्क्यू सेंटर उभारले जाईल. जखमी व आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी व्यवस्था केली जाणार आहे. प्राण्यांसाठी देशातील २५ चिड़ियाघरांशी समन्वय साधून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येईल. प्रकल्प अहवाल तयार असून, केंद्र सरकारची मंजुरी मिळताच काम सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक