पद्म पुरस्कारांची घोषणा, केरळच्या तिघांना पद्मविभूषण तर कोश्यारी आणि शिबू सोरेनना पद्मभूषण पुरस्कार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी पाच जणांना पद्मविभूषण, तेरा जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन या दोघांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. टी. थॉमस, व्हायोलिन वादक एन. राजम, कम्युनिस्ट नेते पी. नारायणन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. धर्मेंद्र आणि एन. राजम वगळता उर्वरित तीन पद्मविभूषण विजेते हे केरळशी संबंधित आहेत. यामुळे केरळ विधानसभा निवडणूक आणि पुरस्कार यांचे कनेक्शन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


गायिका अलका याज्ञिक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, अभिनेता मामुट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, अॅडगुरु पियुष पांडे (मरणोत्तर), एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर.गणेश, बँकर उदय कोटक, भाजप नेते व्ही.के. मल्होत्रा (मरणोत्तर), वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन (मरणोत्तर) या तेरा जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ११३ जणांना केंद्राने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.



Padma Awards 2026_India by prahaarseo


महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण


महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महाराष्ट्रातील लोककलावंत रघुवीर खेडकर, रक्तपेढीसाठी योगदाने देणारे अर्मिडा फर्नांडिस, कृषीतज्ज्ञ श्रीरंग लाड आणि पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.


भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कोश्यारी यांच्याच काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी शपथ घेतली आणि राज्यात जेमतेम तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केले होते. कोश्यारी असतानाच्या काळातच शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची यावरून राजकीय वादांना तोंड फुटले होते. विशेष म्हणजे कोश्यारी हे राज्यातले पहिलेच राज्यपाल होते जे हेलिकॉप्टर ऐवजी पायऱ्यांवरून चालत रायगडावर गेले होते. कोश्यारींची काही वक्तव्ये आणि राज्यपाल म्हणून घेतलेले तसेच न घेतलेले हे देशभर चर्चेचा विषय झाले होते. यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर होताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत