पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक अशी या पुरस्कारांची ओळख आहे. यामुळे हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. यंदा महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनाट्य क्षेत्रातले तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीरंग लाड तसेच पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.



पद्मश्री पुरस्कार विजेते २०२६



  1. आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) - आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात मोलाचे योगदान

  2. अंके गौडा- भारतातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची उभारणी

  3. भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार

  4. बृजलाल भट्ट (जम्मू-काश्मीर)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी

  5. बुदरी ठाडी (छत्तीसगड)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी.

  6. चरण हेम्ब्राम (ओडिशा)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक.

  7. चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास

  8. धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी

  9. डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी

  10. डॉ. पद्मा गुरमीत (लडाख)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठी


कोण आहेत तमाशा कलाकार रघुवीर खेडकर ?



  1. चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत

  2. तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आणि तमाशा फडचालक

  3. 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष

  4. तरुणपणी तमाशात कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण असलेले थाळीनृत्य करण्यासाठी लोकप्रिय

Comments
Add Comment

Randhir Singh Passes Away : एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकणारे दिग्गज नेमबाज रणधीर सिंग यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला समृद्ध करणारे आणि जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे दिग्गज

श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त

Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला

Narendra Modi : सोने खरेदी नंतर; देश प्रथम

भारतीयांना सोन्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या खरेदीमुळे देशाचे परकीय

Ebola virus : युगांडामधून बंगळुरूमध्ये आलेल्या महिलेत आढळली 'इबोला व्हायरस'ची लक्षणे ; रक्ताचे नमुने पाठवले पुण्यात !

इबोला व्हायरस २०२६ : युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशात इबोला संसर्गाची (Ebola Virus) प्रसारण सातत्याने वाढताना

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास