भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार !

पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षात


नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या उभारणीस सुरुवात करत आहे. हे स्थानक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उभारले जाणार असून, त्यामुळे भारताला अंतरिक्षात कायमस्वरूपी वास्तव्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष प्रवासी दीर्घकाळ राहून विविध वैज्ञानिक संशोधन करू शकतील.


या प्रकल्पासाठी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राने पहिल्या मूलघटकाच्या निर्मितीसाठी देशातील वैमानिक व अंतरिक्ष उद्योगांशी औपचारिक संपर्क साधला आहे. हा संपर्क ‘रसद दाखल करण्याची इच्छा’ या प्रक्रियेद्वारे करण्यात आला असून, अंतरिक्षात स्वदेशी संशोधन केंद्र उभारण्याच्या दिशेने हे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे. या पहिल्या घटकाला ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक–०१’ असे नाव देण्यात आले असून, तो संपूर्ण प्रकल्पाचा कणा ठरणार आहे.


इस्रोच्या नियोजनानुसार हा पहिला घटक सन २०२८ मध्ये अंतरिक्षात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर घटक पाठवून सन २०३५ पर्यंत संपूर्ण अंतरिक्ष स्थानक उभारले जाणार आहे. पृथ्वीवरून विविध कालावधीत घटक पाठवून ते अंतरिक्षात एकत्र जोडण्यात येणार आहेत. यासाठी देशातील उद्योगांना दोन संच तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकाचा हा उपक्रम भारताच्या मानवीय अंतरिक्ष कार्यक्रम ‘गगनयान’नंतर तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. इस्रोच्या मते, या स्थानकामुळे दीर्घकालीन वैज्ञानिक प्रयोग करणे शक्य होणार असून, भविष्यातील अंतरिक्ष मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकामुळे भारताला जागतिक पातळीवर अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात स्वतंत्र व भक्कम स्थान मिळणार असून, देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला नवे क्षितिज प्राप्त होणार आहे.

Comments
Add Comment

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! व्यावसायिक नंतर आता घरगुती सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

मुंबई : गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅस (LPG Gas) सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या दुपटीहून अधिक झाल्या

West Bengal Election 2026 : ईव्हीएम वाद पेटला! बंगालमध्ये १५ केंद्रांवर फेरमतदान सुरू; टेप लावून बटणे झाकल्याचा आरोप

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परगणा

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका