भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार !

पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षात


नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या उभारणीस सुरुवात करत आहे. हे स्थानक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उभारले जाणार असून, त्यामुळे भारताला अंतरिक्षात कायमस्वरूपी वास्तव्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष प्रवासी दीर्घकाळ राहून विविध वैज्ञानिक संशोधन करू शकतील.


या प्रकल्पासाठी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राने पहिल्या मूलघटकाच्या निर्मितीसाठी देशातील वैमानिक व अंतरिक्ष उद्योगांशी औपचारिक संपर्क साधला आहे. हा संपर्क ‘रसद दाखल करण्याची इच्छा’ या प्रक्रियेद्वारे करण्यात आला असून, अंतरिक्षात स्वदेशी संशोधन केंद्र उभारण्याच्या दिशेने हे पहिले ठोस पाऊल मानले जात आहे. या पहिल्या घटकाला ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक–०१’ असे नाव देण्यात आले असून, तो संपूर्ण प्रकल्पाचा कणा ठरणार आहे.


इस्रोच्या नियोजनानुसार हा पहिला घटक सन २०२८ मध्ये अंतरिक्षात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर घटक पाठवून सन २०३५ पर्यंत संपूर्ण अंतरिक्ष स्थानक उभारले जाणार आहे. पृथ्वीवरून विविध कालावधीत घटक पाठवून ते अंतरिक्षात एकत्र जोडण्यात येणार आहेत. यासाठी देशातील उद्योगांना दोन संच तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकाचा हा उपक्रम भारताच्या मानवीय अंतरिक्ष कार्यक्रम ‘गगनयान’नंतर तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. इस्रोच्या मते, या स्थानकामुळे दीर्घकालीन वैज्ञानिक प्रयोग करणे शक्य होणार असून, भविष्यातील अंतरिक्ष मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय अंतरिक्ष स्थानकामुळे भारताला जागतिक पातळीवर अंतरिक्ष संशोधन क्षेत्रात स्वतंत्र व भक्कम स्थान मिळणार असून, देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला नवे क्षितिज प्राप्त होणार आहे.

Comments
Add Comment

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा