विमा कर्मचाऱ्यांच्या पगारात अन् पेन्शनमध्येही वाढ

मुंबई  : केंद्रातील मोदी सकारने पेन्शन अन् पगार वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्या (पीएसजीआयसी) यांच्या तब्बल ४६ हजार कर्मचारी अन् ४६ हजारांपेक्षा अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन अन् पेन्शन सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनमधील सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १० टक्के वाढ मंजूर झाली आहे. तर नाबार्डमधील ग्रुप 'अ', 'ब' व 'क' कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन-भत्त्यात वाढ मिळेल. तर पीएसजीआयसी कर्मचाऱ्यांसाठी एकूण वेतन बिलात १२.४१ टक्के वाढ आणि मूलभूत वेतन व महागाई भत्त्यात १४ टक्के वाढ मिळणार आहे. आरबीआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १ नोव्हेंबर २०२२ पासून १० टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर नाबार्डमधील कर्मचाऱ्यांना २० टक्के वाढ तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला पूर्वीच्या आरबीआय-नाबार्ड पेन्शनशी जुळवून घेतले जाणार आहे. ही माहिती केंद्र सरकारने नुकतेच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

Comments
Add Comment

Pralhad Joshi : प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान

Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा

Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)