राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीती


मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि कांदिवलीतील सर्व परिसर बॅनरमुक्त झाला. मार्ग, चौक, नाके, सिग्नल चौक, दुभाजक, सुशोभीकरण केलेले चौक आणि स्काय वॉक आदींनी मोकळा श्वास घेतला होता. निकाल जाहीर झाला आणि राजकीय पक्षांचे विजयाचे तसेच पराजयाचे आभार व्यक्त केल्याचे बॅनर सर्वच परिसरात, नाके चौकात झळकळे राजकीय पक्षांनी बॅनर बाजी करून परिसर विद्रुप केला. पालिकेने बॅनर बाजीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच पर्यावरण प्रेमीकडून केली जात आहे.


मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाला पालिकेने करोडो रुपये खर्च करून, चौक नाके आणि सिग्नल चौकांचे सुशोभीकरण केले. मात्र राजकीय पक्ष, मंडळे, संस्था आणि स्वयंम घोषित कार्यकर्ते यांच्या बॅनरबाजीमुळे कांदिवली विभागातील उद्यान, चौक, नाके, सिग्नल, पर्जन्य वृक्ष, पालिका शाळा, दुभाजक आणि स्काय वॉक परिसर विद्रुप होतात. पालिकेचे एक वाहन घेऊन कर्मचारी दिवसाला दोन तीन विभागात कारवाई करत लावलेले बॅनर काढतात. अशा प्रकारे विभागा विभागात जाऊन बॅनरवर कारवाई करतात. दुसऱ्या दिवशी बॅनरबाजी केली जाते. थोडक्यात तक्रारी नंतर पालिका कारवाई करते आणि बहुतांशी राजकीय पक्षांचे खासदार, आमदार वा नगरसेवक पुन्हा बॅनरबाजी करतात. मार्गातील दुभाजक व विजेच्या खांबावर लावण्यात येणारे बॅनर बहुतांशी फाटतात, लटकतात, परिणामी अपघात होतात. २२ जानेवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु झाला आहे. मंडळाचे देणगीदार म्हणजे विकासक आणि सोन्या-चांदीच्या वापऱ्यांकडून प्रवेशद्वार, कमान, मुख्य चौकात आणि मार्गात लावण्यात येतात, आधीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या मार्गांवर, कोंडीत भर पडते.


आर/दक्षिण वरिष्ठ निरीक्षक राजेशकुमार सिंग यांच्याशी तीन चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सामाजिक कार्यकर्ते यतीन भिंगार्डे न्यायालयाने पालिकेवर बॅनर बाजीच्या कारवाई संदर्भात ताशोरे ओढले असून देखील यावर योग्य, कडक आणि निर्णायक तोडगा काढला नाही. नियम अंमलात आलेले नाही. यगमुळे बॅनर बाजीचे, परिसर विदरूपीकरण चक्र असेच सुरु राहाणार.

Comments
Add Comment

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas