अमित शहांचा नांदेड दौरा रद्द ? नेमकं काय घडलं ?

नांदेड : शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड येथे होणार होते. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण नेमके काय कारण आहे हे अद्याप समजलेले नाही.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर येणार असल्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली होती. संपूर्ण नांदेडमध्ये तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता. भाजपच्या नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह होता. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.



नांदेड महापालिका निवडणूक निकाल २०२६


राज्यातील नांदेडसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले. नांदेड महापालिकेत वीस वॉर्डातील ८१ जागांसाठी निवडणूक झाली आणि भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेचा चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला. काँग्रेस दहा जागा जिंकू शकली. तर इतर पक्षांचा २० जागांवर विजय झाला.

Comments
Add Comment

Pralhad Joshi : प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान

Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा

Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)