कमल आर खानला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; मुंबईतील एका निवासी इमारतीवर झाडल्या गोळ्या

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान याला ओशिवरा गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. १८ जानेवारी रोजी, अभिनेता-सोशल मीडिया सेलिब्रिटी कमाल रशीद खान यांना मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा येथील एका निवासी इमारतीत चार राउंड गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली.


लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (४५) हे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात, तर मॉडेल प्रतीक बैद (२९) चौथ्या मजल्यावर राहतात.सुरुवातीला गोळीबार कोणी केला हे स्पष्ट झाले नव्हते. तपासात असे समोर आले आहे की केआरकेनेच गोळीबार केला होता. त्यामुळे आता अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशी करताना कमाल आर खानने स्वतःच्या परवानाधारक बंदुकीने गोळीबार केल्याची कबुली दिली.


बंदुकीचा परवाना कधी मिळाला?


केआरकेने २००५ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातून बंदुकीचा परवाना मिळवला. उत्तर प्रदेशातून बंदूक मिळाल्यानंतर त्याने तो मुंबईत आणला. गेल्या वीस वर्षांपासून त्याने ती बंदूक मुंबईतील त्याच्या घरी ठेवली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, त्यानंतर त्याने त्याची परवाना असलेली बंदूक वर्सोवा पोलिस ठाण्यात जमा केली.


आचारसंहिता संपल्यानंतर, कमाल खानने वर्सोवा पोलिस स्टेशनमधून बंदूक परत आणली. चार-पाच दिवसांनी, घरी बंदूक साफ करताना, त्याने त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी दोन गोळ्या झाडल्या. यावेळी, त्याने लोखंडवाला बॅकसाइड रोडवरील एका झाडावर गोळीबार केला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने, गोळी जवळच्या नालंदा इमारतीला लागली.


यानंतर,ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनी प्रकरणाचा तपास केला आणि अभिनेता कमाल आर खानला चौकशी केल्यानंतर अटक केली. केआरकेचा असा दावा आहे की त्याचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून