जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज

पनवेल : रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पनवेल तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ८ गटांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पनवेलमध्ये यंदाही मुख्य लढत भाजप आणि शेकाप यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे झाली आहेत, त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तालुक्यात एकूण ३४६ केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन विजयाचे गुलाल उधळले जातील. गेल्या काही वर्षांत अनेक मातब्बर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बदलल्याने जुन्या गणितांना छेद मिळण्याची शक्यता आहे. भाजप आपली सत्ता राखणार की शेकाप पुन्हा एकदा वर्चस्व मिळवणार, याचा फैसला ७ फेब्रुवारीला होईल. सध्या तरी सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली असून गावपातळीवरील बैठका आणि रणनीतीला वेग आला आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या