राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला


नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणातील केवळ दोन ओळी वाचल्या आणि ते सभागृहातून निघून गेले. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज झाले असून त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्व सदस्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हिंदीत दोन ओळी वाचल्या. ‘माझे सरकार राज्याच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाचा वेग दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. जय हिंद, जय कर्नाटक’, इतके वाचून राज्यपाल यांनी सभात्याग केला. यानंतर काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडू नंतर कर्नाटक राज्याचाही राज्यपालांशी असलेला संघर्ष उघड झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सभागृहात भाषणाला मंजुरी देण्याआधी ११ उतारे हटविण्यास सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्रिमंडळाने त्यास नकार दिला होता.

Comments
Add Comment

Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Blast) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत

Crime News : प्रियकरासाठी पतीचा 'गेम', आधी छतावरून फेकलं, मग रुग्णालयात केला 'काम तमाम'

नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन  तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व