माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी दोन दिग्गज सर्जनशील व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणले आहे—प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल.


माहिती व प्रसारण मंत्रालयच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील चित्ररथासाठी संजय लीला भन्साळी यांनी ‘भारत गाथा’ ही संकल्पना साकारली आहे. हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे, कारण पहिल्यांदाच एखादा भारतीय चित्रपट दिग्दर्शक देशाच्या सर्वात मोठ्या औपचारिक समारंभात भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विशेष दृष्टीकोनाला अधिक प्रभावी रूप देण्यासाठी भन्साळी यांनी श्रेया घोषाल यांची निवड एका खास गीतासाठी केली आहे. हे गीत २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथावर सादर होणाऱ्या टॅब्लोसह ऐकायला मिळणार आहे.


‘भारत गाथा’शी संबंधित माहिती व प्रसारण मंत्रालयाचा हा चित्ररथ भारताच्या कथाकथनाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवतो—जिथे संगीत, दृश्य, अभिनय आणि सिनेमा एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. आजच्या काळात भारतीय सिनेमा देशाच्या कथा जगासमोर मांडण्याचे एक सशक्त माध्यम ठरले आहे. त्यामुळेच या भव्य सांस्कृतिक प्रवासात सिनेमाला विशेष स्थान देण्यात आले आहे.


या प्रकल्पाशी संबंधित एका जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “संजय लीला भन्साळी यांनी संकल्पित केलेल्या ‘भारत गाथा’ या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी श्रेया घोषाल यांनी एक विशेष गीत गायले आहे. भन्साळी यांच्या कथाकथनात संगीताला नेहमीच महत्त्वाचे स्थान असते आणि श्रेया यांच्यासोबतचे त्यांचे सहकार्य नेहमीच वेगळी भावनिक खोली निर्माण करते. याआधीही या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अनेक क्षण दिले आहेत आणि यावेळी तोच संगीतमय जादू कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.”


हा सहकार्य माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये भारतीय सिनेमाकडे केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर भारताच्या सभ्यतागत कथाकथनाच्या परंपरेचा विस्तार म्हणून पाहिले जाते—एक अशी सांस्कृतिक ताकद जी आजही जागतिक पातळीवर देशाची ओळख ठरते. भन्साळी यांची सिनेमाई दृष्टी ‘भारत गाथा’ला आकार देत आहे, तर श्रेया घोषाल यांचा स्वर त्यात प्राण फुंकत आहे. या प्रकारे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा ‘भारत गाथा’ टॅब्लो भारतीय कथाकथनाच्या परंपरेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा ठरणार आहे—जिथे इतिहास, संस्कृती आणि सिनेमा एकत्र येतात.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर