‘एमआयएम’च्या नगरसेविका सहर शेखला पोलिसांची नोटीस

मुंब्रा  :महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. विजयानंतर केलेल्या आक्रमक भाषणामुळे मुंब्रा पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ‘कैसा हराया?’ असा टोला लगावत, पुढील पाच वर्षांत “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू,” असे विधान केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या विधानाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली असून, समाजात असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळण्याची कडक तंबी दिली आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी स्पष्टीकरण देत, “माझं वक्तव्य सटायर स्वरूपाचं होतं. त्याला सांप्रदायिक अर्थ काढू नये. मी पूर्णपणे सेक्युलर विचारांची आहे,” असा दावा केला आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात असून, त्यानंतर निर्माण झालेल्या या वादामुळे परिसरातील राजकारण अधिक तापले आहे.

Comments
Add Comment

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या