श्रीदत्त इंटरप्रायझेसमध्ये भीषण स्फोट

वाडा : वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या श्रीदत्त इंटरप्रायझेस या टायर रिसायकलिंग कंपनीत बुधवारी रात्री उशिरा रिअॅक्टरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात चार कामगार गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे तालुक्यातील बेकायदेशीर आणि धोकादायक कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदत्त इंटरप्रायझेसमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑईल आणि तारा काढण्याचे काम केले जाते. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास काम सुरू असताना अचानक रिअॅक्टरचा स्फोट झाला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. रात्रीची वेळ असल्याने कामगारांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. वाडा तालुक्यात सुमारे ७७ हून अधिक कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांना प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याने प्रशासनाने 'बंद'च्या नोटिसा दिल्या आहेत. मात्र, तरीही अनेक कंपन्यांचे मालक रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने उत्पादन सुरू ठेवतात. गेल्याच महिन्यात लखमापूर येथील टायर कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच उसरमध्ये पुन्हा भीषण अपघात झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक