महाडमध्ये जि. प.साठी २५, तर पं. स. साठी ४३ अर्ज

महाड : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी एकूण २५ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी एकुण ४३ उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसा अखेर दाखल झाले आहेत. २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखे नंतर तालुक्यात लढत दुरंगी की तिरंगी होणार हे स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील बिरवाडी जि.प. गटात शिवसेनेकडून मंदा भागोजी ढेबे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून पल्लवी प्रदीप बागडे, शिवसेना ठाकरे गटाकडून दिपाली सुभाष मोरे, राष्ट्रवादी कडून रिया रविंद्र घोलप ( डमी) असे ४ अर्ज दाखल असून या गटात तिरंगी लढत होणार आहे. धामणे पं. स. गणात शिवसेनेकडून अनिल नारायण जाधव, ओंकार अनिल जाधव (डमी), राष्ट्रवादी कडून गणेश लक्ष्मण खामकर असे ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे.पण बिरवाडी पं स गणात शिवसेनेकडून लक्ष्मण नारायण वाडकर, राष्ट्रवादी कडून मयुर पुंडलिक जाधव, राजेश चंद्रकांत जाधव(डमी), असे ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे.


खरवली जि प गटात शिवसेनेकडून मनाली मनोज काळीजकर, राष्ट्रवादीकडून निकीता दत्ता सुतार, रिया रविंद्र घोलप (डमी), शिवसेना ठाकरे गटाकडून पुर्वा आनंद सुर्वे असे ४ अर्ज दाखल असून या गटात तिरंगी लढत होणार आहे.
वरंध पं स गणात भाजपकडून ७ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार आहे. खरवलीत शिवसेनेकडून४ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे. नडगांव तर्फे शिवसेनेकडून ६ अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. नडगावतर्फे ४ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार. नाते गणात ५अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. दासगांवमध्ये ३ अर्ज दाखल.दासगांव ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे. तुडीलमध्ये शिवसेनेकडून ४ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार. करंजाडी राष्ट्रवादीकडून ८ अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. करंजाडीत शिवसेनेकडून ५ अर्ज दाखल होणार आहे. विन्हेरेत शिवसेनेकडून ५ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव