कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या आगमनावेळी गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या भेटीमुळे उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले. मंडळांनी उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


भाविकांनी विधिवत पूजा-अर्चा, आरती, भजन-कीर्तन आणि प्रसाद वितरण यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.


या निमित्ताने तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत उत्सव साजरा केला. पालकमंत्रींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण व प्रभावी झाला, तर स्थानिक नागरिकांनीही एकत्र येऊन परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचे जतन केले.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar News:हुंडा न दिल्यामुळे सुनेचा छळ ,महीलेनं विहीरीत पडुन मृत्यु..सासरच्यांनी रचला प्लॅन

छ.संभाजीनगर: संभाजीनगरमधील सिल्लोड तालूक्यतील पळशी येथे भंयकर प्रकरण बाहेर पडलं आहे.१९ वर्षीय करुणा निकमचे,

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

सर्वाधिक रोजगार निर्मितीत ईशा अंबानी ठरल्या क्रमांक एक उद्योजिका! 'Uth Series २०२५' मधील मोठी क्रमवारी समोर

मोहित सोमण: अवेंनडस वेल्थ व हुरून इंडिया यांनी युथ (Uth) सिरीज २०२५ केलेल्या उद्योजकांचा क्रमवारीत ईशा अंबानी यांनी

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ ॥

कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।। अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥ तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची

पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू