जि.प. पं. स.च्या निवडणुकीसाठी अलिबागमधू्न १५० अर्ज दाखल

जिल्हा परिषद ७ जागांसाठी ५५, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ उमेदवार


अलिबाग : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ५५, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ अर्ज असे एकुण १५० अर्ज दाखल झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, १८ जानेवारीपर्यंत पौष महिना होता. तो अशुभ मानला जात असल्याने उमेदवारांनी १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्यातच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करताना प्रतिस्पर्धी पक्ष कोणता उमेदवार देतो याची चाचपणी सुरू ठेवली, तसेच युती-आघाड्यांची गणिते जुळतात का, याचाही अंदाज बांधला जात होता.


त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला. युती, आघाडीचे प्रयत्नही केले जात होते. बंडखोरी टाळण्यासाठीदेखील राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. काही उमेदवारांनी अगदी शेवटची १५ मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वेळ साधतानाही अनेक उमेदवारांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा फंडा अवलंबला. शेवटपर्यंत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक टेन्शनमध्ये होते. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली.


रायगड जिल्ह्यात यावेळी युती विरुद्ध आघाडी असे चित्र सध्यातरी दिसत आहे; परंतु काही ठिकाणी विचित्र आघाड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. युती-आघाडीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही गणिते जुळली, तर अर्ज मागे घेतले जातील. अर्ज मार्ग घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. तोपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून
राहिले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या