प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील हजेरी बंद करून केवळ आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रीक हजेरीचा वापर करण्यात आला आहे. परंतु कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी सक्तीचे करणाऱ्या प्रशासनाकडून नगरसेवकांच्या सभागृह आणि समित्यांच्या बैठकीतील हजेरी बायोमेट्रीक आता तरी केली जाणार आहे का? महापालिकेत पुढील आठवड्यापासून नगरसेवक दाखल होणार असून सभागृह आणि विविध समित्यांच्या बैठकांसाठी बायोमेट्रीक हजेरीचा ठराव करूनही महापालिका सचिव विभागाला विसर पडलेला दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला तसेच विविध समित्यांना उपस्थित राहणाऱ्या सर्व नगरसेवकांची हजेरी ही आजही नोंदवहीवर घेण्यात येते. महापालिकेतील बैठकीमध्ये येताना नगरसेवक महापालिका सभागृहाबाहेर ठेवलेल्या उपस्थिती पटावर सही करून सभागृहात परंतु काही नगरसेवक उपस्थिती पटावर सही करून सभागृहात न येताही निघून जातात. त्यामुळे सभागृहात प्रवेश करताना आणि सभागृहातील कामकाज संपल्यानंतर हजेरी नोंदवल्यास कोणता नगरसेवक किती वाजता निघून गेला किंवा ते सही करून परस्पर निघून गेले यांची माहिती समोर येणार आहे.


यासर्वांचा विचार करूनच भाजपाचे तत्कालिन गटनेते मनोज कोटक यांनी या सन २०१८मध्ये महापालिका सभागृहाच्या दरवाजांवर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रीक मशीनसह सी.सी.टिव्ही कॅमेरा बसवण्यात यावे,अशी मागणी केली होती. त्यावर मानव संसाधन विभागाने याबाबतचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी गटनेत्यांच्या बैठकीत घेणे संयुक्तिक होईल,असे उत्तर दिले होते. आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रिक हजेरी पद्धत कार्यान्वित करताना संपूर्ण प्रक्रिया विकेंद्रीत प्रद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खाते व विभाग प्रमुख यांना आवश्यकतेनुसार बायोमेट्रीक उपकरणे आपल्या स्तरावर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच बायोमेट्रीक उपकरणे सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा प्राप्त करून या सेवा अखंडित सुरु ठेवण्याचीही संपूर्ण जबाबदारी प्रत्येक खाते व विभाग प्रमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


त्याअनुषंगाने महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशीन्ससह सी.सी.टिव्ही बसवण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेणे योग्य ठरेल,असे प्रशासनाने स्पष्ट केल होते. परंतु याबाबत महापालिका सचिव, मानव संसाधन विभाग तसेच यांत्रिक व विद्युत विभागाला याचा सर्व विसर पडला आहे.


मागील ०७ मार्च २०२२ रोजी महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर पावणे चार वर्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. परंतु महापालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयाचाच महापालिका प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे