प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील हजेरी बंद करून केवळ आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रीक हजेरीचा वापर करण्यात आला आहे. परंतु कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी सक्तीचे करणाऱ्या प्रशासनाकडून नगरसेवकांच्या सभागृह आणि समित्यांच्या बैठकीतील हजेरी बायोमेट्रीक आता तरी केली जाणार आहे का? महापालिकेत पुढील आठवड्यापासून नगरसेवक दाखल होणार असून सभागृह आणि विविध समित्यांच्या बैठकांसाठी बायोमेट्रीक हजेरीचा ठराव करूनही महापालिका सचिव विभागाला विसर पडलेला दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला तसेच विविध समित्यांना उपस्थित राहणाऱ्या सर्व नगरसेवकांची हजेरी ही आजही नोंदवहीवर घेण्यात येते. महापालिकेतील बैठकीमध्ये येताना नगरसेवक महापालिका सभागृहाबाहेर ठेवलेल्या उपस्थिती पटावर सही करून सभागृहात परंतु काही नगरसेवक उपस्थिती पटावर सही करून सभागृहात न येताही निघून जातात. त्यामुळे सभागृहात प्रवेश करताना आणि सभागृहातील कामकाज संपल्यानंतर हजेरी नोंदवल्यास कोणता नगरसेवक किती वाजता निघून गेला किंवा ते सही करून परस्पर निघून गेले यांची माहिती समोर येणार आहे.


यासर्वांचा विचार करूनच भाजपाचे तत्कालिन गटनेते मनोज कोटक यांनी या सन २०१८मध्ये महापालिका सभागृहाच्या दरवाजांवर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रीक मशीनसह सी.सी.टिव्ही कॅमेरा बसवण्यात यावे,अशी मागणी केली होती. त्यावर मानव संसाधन विभागाने याबाबतचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी गटनेत्यांच्या बैठकीत घेणे संयुक्तिक होईल,असे उत्तर दिले होते. आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रिक हजेरी पद्धत कार्यान्वित करताना संपूर्ण प्रक्रिया विकेंद्रीत प्रद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खाते व विभाग प्रमुख यांना आवश्यकतेनुसार बायोमेट्रीक उपकरणे आपल्या स्तरावर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच बायोमेट्रीक उपकरणे सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा प्राप्त करून या सेवा अखंडित सुरु ठेवण्याचीही संपूर्ण जबाबदारी प्रत्येक खाते व विभाग प्रमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


त्याअनुषंगाने महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशीन्ससह सी.सी.टिव्ही बसवण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेणे योग्य ठरेल,असे प्रशासनाने स्पष्ट केल होते. परंतु याबाबत महापालिका सचिव, मानव संसाधन विभाग तसेच यांत्रिक व विद्युत विभागाला याचा सर्व विसर पडला आहे.


मागील ०७ मार्च २०२२ रोजी महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर पावणे चार वर्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. परंतु महापालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयाचाच महापालिका प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस :