राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह


मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेली युती ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीनेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या युतीची माहिती राज ठाकरेंना नव्हती आणि त्यामुळे ते व्यथित होते, असा उबाठा गटाचा दावा फोल ठरला असून, ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती. या युतीला बहुमत मिळाले. तर मनसेने उबाठा गटासोबत निवडणूक लढवली होती, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या आठवडाभरात मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर, या युतीची कल्पना राज ठाकरे यांना नव्हती आणि त्यामुळे ते नाराज असल्याचा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, हा दावा तथ्यहीन असल्याचे आता समोर आले आहे.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९