राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह


मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेली युती ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीनेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या युतीची माहिती राज ठाकरेंना नव्हती आणि त्यामुळे ते व्यथित होते, असा उबाठा गटाचा दावा फोल ठरला असून, ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती. या युतीला बहुमत मिळाले. तर मनसेने उबाठा गटासोबत निवडणूक लढवली होती, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या आठवडाभरात मनसेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर, या युतीची कल्पना राज ठाकरे यांना नव्हती आणि त्यामुळे ते नाराज असल्याचा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, हा दावा तथ्यहीन असल्याचे आता समोर आले आहे.

Comments
Add Comment

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पाकिस्तान सोडा, मायदेशी परता; अमेरिकेचे कराची आणि लाहोरमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना निर्देश

वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या