पोलादपूरमध्ये ११ नामनिर्देशन पत्र दाखल

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, शेकापचे उमेदवार रिंगणात


पोलादपूर : तालुक्यात पंचायत समितीच्या चार गणांसाठी २४ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी ११ नामनिर्देशनपत्र दाखल झाली असून राष्ट्रवादी, राकाँ.शप, भाजप, शिवसेना, शेकाप, काँग्रेस, मनसे, उबाठा, जनता दल सेक्युलरचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवारी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. लोहारे ५९ जि.प. सर्वसाधारण गटामध्ये चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (भाजपा), मुरलीधर दरेकर (शिवसेना उबाठा), एकनाथ गायकवाड (शेकाप), रझाक करबेलकर (काँग्रेस), वैभव चांदे (भाजपा), सतीष शिंदे (शिवसेना), अशा एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. कापडे बुद्रुक ५८ जि.प.नामाप्र गटामध्ये डॉ.निलेश कुंभार (शिवसेना), अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजपा) आणि असे एकूण तीन उमेदवार रिंगणात आहे.


माटवण ११५ येथे नामाप्र महिला पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून शेकापतर्फे सुनीता पवार, साक्षी कांबळेकर, राष्ट्रवादीतर्फे मीनाक्षी सुतार, राकाँशप पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर असे एकूण चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. कापडे बुद्रुक ११६ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिल दळवी आणि प्रकाश कदम, राष्ट्रवादीतर्फे अनिल मालुसरे, शेकापतर्फे मनोहर पार्टे, शिवसेना उबाठाचे पांडुरंग सोंडकर, जनतादल सेक्युलरचे भगवान साळवी, असे एकूण ८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.

Comments
Add Comment

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात