पोलादपूरमध्ये ११ नामनिर्देशन पत्र दाखल

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, शेकापचे उमेदवार रिंगणात


पोलादपूर : तालुक्यात पंचायत समितीच्या चार गणांसाठी २४ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी ११ नामनिर्देशनपत्र दाखल झाली असून राष्ट्रवादी, राकाँ.शप, भाजप, शिवसेना, शेकाप, काँग्रेस, मनसे, उबाठा, जनता दल सेक्युलरचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवारी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. लोहारे ५९ जि.प. सर्वसाधारण गटामध्ये चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (भाजपा), मुरलीधर दरेकर (शिवसेना उबाठा), एकनाथ गायकवाड (शेकाप), रझाक करबेलकर (काँग्रेस), वैभव चांदे (भाजपा), सतीष शिंदे (शिवसेना), अशा एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. कापडे बुद्रुक ५८ जि.प.नामाप्र गटामध्ये डॉ.निलेश कुंभार (शिवसेना), अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजपा) आणि असे एकूण तीन उमेदवार रिंगणात आहे.


माटवण ११५ येथे नामाप्र महिला पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून शेकापतर्फे सुनीता पवार, साक्षी कांबळेकर, राष्ट्रवादीतर्फे मीनाक्षी सुतार, राकाँशप पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर असे एकूण चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. कापडे बुद्रुक ११६ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिल दळवी आणि प्रकाश कदम, राष्ट्रवादीतर्फे अनिल मालुसरे, शेकापतर्फे मनोहर पार्टे, शिवसेना उबाठाचे पांडुरंग सोंडकर, जनतादल सेक्युलरचे भगवान साळवी, असे एकूण ८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित