बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले

ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चा


मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित एक हजार गाड्यांपैकी २५ टक्के गाड्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. पुरवठादाराकडून बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले आहे. वारंवार कालमर्यादा ओलांडलेल्या पुरवठादारांवर ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


केंद्रीय अनुदानावर एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ३० टक्के बसगाड्या विजेवर धावणाऱ्या करण्यासाठी पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. १३ फेब्रुवारी २०२४ पासून या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली. वर्षभरानंतर केवळ २२२ गाड्या दिल्याने महामंडळाने पुरवठादाराला नाममात्र चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल २०२५ पासून दरमहा २०० गाड्या देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने महामंडळाला दिले, मात्र डिसेंबरअखेर ५१५ गाड्यांची भर पडली.


३१ डिसेंबर २०२५ अखेर ७३७ बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात नऊ मीटरच्या २६० व १२ मीटरच्या ४७७ अशा गाड्यांचा समावेश आहे. परिणामी, एसटी प्रवासी अन्य प्रवासी वाहनांकडे वळत आहेत. एसटीच्या वाहन स्थितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत एसटी ताफ्यात १५ हजार २२१ बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे मार्गात बंद पडणे, नादुरुस्त असणे, गाड्यांची स्थिती बिकट असणे अशा तक्रारी वाढत आहेत.


राज्यातील १७१ ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामदेखील याच बस-पुरवठादाराकडे आहे. डिसेंबरअखेर केवळ ३१ ठिकाणी अशी स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.


एसटी महामंडळाला बसची गरज : एसटी कर्मचाऱ्यांचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या संपाची एसटी महामंडळाला मोठी झळ बसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा २०२१ मध्ये झालेला संप सुमारे ५४ दिवस चालला होता, जो २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला आणि २० डिसेंबर २०२१ रोजी संपला, ज्यात कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. तब्बल दोन महिने बस जाग्यावरच उभ्या राहिल्याने अनेक बसवर परिणाम झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)