मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. या अधिकारी आणि अभियंत्यांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते बुधवारी २१ जानेवारी २०२५ रोजी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) (अतिरिक्त पदभार) मंतय्या स्वामी, सहायक आयुक्त शंकर भोसले आदींसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते उपस्थित होते.


शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सदर रस्ता टप्याटप्याने १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२५ पासून सर्व मार्गिका पूर्णवेळ खुल्या करण्यात आल्या आहेत.


मुंबईसारख्या गतिमान शहरातील प्रवासाचा कालावधी कमी करणे, इंधनाची बचत साधणे तसेच वायूप्रदूषणात घट घडविणे असा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शहरातील वाहतुकीची गती व एकूणच शहरी गतिशीलता आणखी सुधारण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.


हा प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा प्रतिष्ठित, महत्त्वाकांक्षी आणि बहुविध घटकांचा समावेश असलेला पायाभूत सुविधा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व अभियंते यांनी प्रकल्पाच्या नियोजन, अभिकल्पना, समन्वय आणि बांधकाम या सर्व टप्प्यांमध्ये प्रदर्शित केलेल्या तांत्रिक कौशल्य, अभिनव अभियांत्रिकी उपाययोजना आणि अखंड कार्यनिष्ठा यांचे फलित म्हणजे हा प्रकल्प आहे.


वरील प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रदर्शित केलेली कार्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उत्कृष्ट समन्वय लक्षात घेता महानगरपालिका आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.


यावेळी चंद्रकांत कदम, भूपेंद्र राठोड, ऋषिकेश पाटील, अर्चना रामगिरी, डॉ. विशाल ठोंबरे, संदीप चौरे, प्रशांत जगताप, विजय जोरे, प्रणव जगदाळे, श्री. अमित सिंग, निखिल मालुंजकर, नितेश चौधरी, आशीष फुलझेले, जयेश फंदाडे, प्रणाली भोसले आदी उपस्थित होते.

Comments

shekhar pathare    January 21, 2026 09:55 PM

साहेब, २०२६ सुरू झालंय. आहात कुठे?

Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील

Shambhuraj Desai : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक; प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत माहिती

- अधिवेशदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या

Pratap Sarnaik : अवैध पार्सल वाहतूक केल्यास खासगी बस चालकांचे लायसन्स होणार सस्पेंड

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; एसटी महामंडळाकडून ८ हजार ३०० बसची खरेदी मुंबई : राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक,