श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा


मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या माघी गणेश जयंतीनिमित्त माघ श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवारपासूनच या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी ते रविवार, २५ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.


या महोत्सवादरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज पहाटे सकाळी ५ ते ५.३० दरम्यान काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर महानैवेद्य, नमस्कार, अभिषेक तसेच अन्य विधी पार पडतील. सायंकाळी लोकनृत्य, भजन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यसंगीत अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


विविध कलाकारांचे सादरीकरण : सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध तालवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शिवमणी यांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी बासरीवादनाचे ज्येष्ठ कलाकार पंडित राकेश चौरसिया यांची बासरी मैफल होईल. संध्याकाळी ओडिसी नृत्यप्रकाराचे सादरीकरणही होणार आहे. बुधवारी प्रसिद्ध सतारवादक पंडित निलाद्री कुमार यांचा सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रघुनाथ फडके यांचे गीत रामायण सादरीकरणही होणार आहे.


२२ तारखेला भव्य रथ शोभायात्रा : २२ जानेवारीला मुख्य माघी गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता भव्य रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते विजय घाटे यांचे तबलावादन होईल.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

'जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध