मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या' पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या उबाठाच्या अधिकृत बैठकींपासून दूर राहिल्याने आणि हालचालींमध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. अशाच पार्श्वभूमीवर डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे उबाठाच्या नगरसेवकांची बैठक आणि गटनोंदणीसाठी नवी मुंबईला जाण्याच्या प्रक्रियेत त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.


डॉ. सरिता म्हस्के यांनी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा संभाव्य निर्णय उबाठासाठी धक्का मानला जात आहे. जर त्या अधिकृतपणे गट बदलल्यास उबाठाच्या नगरसेवकांची संख्या कमी होऊन पक्षाची ताकद कमी होणार आहे.


मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने उबाठाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात