अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर महायुतीच्या दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करत एकत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तिन्ही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष मिळून महापौर बसवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.


 

मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत परतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत तिन्ही महानगरपालिकांतील सत्तावाटप, महापौरपद आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत अंतिम रूपरेषा ठरवली जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना, “तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला असून, त्या जनादेशानुसारच महायुतीची सत्ता स्थापन होईल,” असे स्पष्ट केले.

 

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेने १३१ पैकी ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी भाजपकडून अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेतेपदासाठी आग्रही भूमिका घेतल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला होता. सन्मानजनक वाटा न मिळाल्यास ‘दुसऱ्या भूमिके’चा पर्याय खुला असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले होते.

 

दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना (५३) आणि भाजप (५०) हे दोन्ही पक्ष बहुमतापासून दूर असतानाही आपापला महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी उबाठाचे चार नगरसेवक आपल्याकडे वळवून मनसेचाही पाठिंबा मिळवला होता. तर, उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने शिवसेना आघाडीने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र, महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढवली असताना, जनादेशाचा अशाप्रकारे अपमान करणे भविष्यातील राजकारणासाठी घातक असल्याने दोन्ही पक्षांनी समन्वयातून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

Gokul Milk Rate : गायीचे दूध आता महाग! गोकुळचा मोठा निर्णय, २१ मेपासून नवे दर लागू

कोल्हापूर : कोल्हापूरातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या गोकुळ दूध

Gold and Silver Import : सोन्या-चांदीच्या आयातीवर सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

मुंबई : देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मौल्यवान धातूंच्या वाढत्या आयातीवर नियंत्रण

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे