मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा प्रकल्प, बोरिवली–विरार पट्ट्यात रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या पायाभूत बदलांचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या मार्गावर धावणार असून, गर्दी आणि विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे.


कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने पुढील टप्प्याला सुरुवात केली आहे. सुमारे २६ किलोमीटरच्या या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पुनर्रचना केली जाणार आहे. या कामासाठी आतापर्यंत विविध टप्प्यांमध्ये वाहतूक ब्लॉक्स घेण्यात आले होते.



२१८४ कोटींचा खर्च, २०२८ पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प


या संपूर्ण योजनेसाठी अंदाजे २१८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. विद्यमान मार्गिकांच्या पश्चिम बाजूला दोन नवीन रेल्वे ट्रॅक उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन मोठे पूल, १६ लहान पूल आणि एक नवीन भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.


वसई खाडीवरील महत्त्वाचे पूल क्रमांक ७३ आणि ७४ या प्रकल्पाचा भाग असून, त्यातील एका पुलाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. तर भाईंदर परिसरातील जुना आणि जीर्ण झालेला ऐतिहासिक पूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



या स्थानकांमध्ये मोठे बदल


भाईंदर आणि वसई रोड स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जाणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, सध्याच्या फलाटांचा पुनर्वापर आणि प्रवाशांच्या हालचाली सोप्या व्हाव्यात यासाठी रचना बदलली जाणार आहे. दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवरही सुधारणा केल्या जाणार आहेत.


दहिसरचे प्लॅटफॉर्म उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिम दिशेला तर विरारचे प्लॅटफॉर्म थोडेसे दक्षिणेकडे हलवले जाणार आहेत. या बदलांमुळे स्थानकांतील गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या थांबण्याचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.



प्रवाशांना काय फायदा होणार?


या प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. परिणामी वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध होईल, विलंब कमी होतील आणि रोजच्या प्रवासात मुंबईकरांना दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेवरील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रवास अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू

Water Metro: मुंबईच्या समुद्रात ८ मार्गांवर धावणार 'वॉटर मेट्रो' - मंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणार मुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी

Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला

Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची

२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित

अल्पसंख्याक प्रमाणपत्र घोटाळ्यात मंत्रालयातील उपसचिव रडारवर - अनियमितता करणाऱ्यांची गय नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक