भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष वेधलं गेलं आहे. या व्हिडिओचा संबंध कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेशी जोडला जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारतावरील संभाव्य दहशतवादी कारवायांबाबत चर्चा सुरू झाली आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्या राजकीय आघाडीशी संबंधित काही लोक दिसत आहेत. या फूटेजमध्ये पाकिस्तानातील तरुणांना विशेष स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण जमिनीवर नव्हे, तर पाण्यातील कारवायांसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.


या प्रकारामुळे २६/११  च्या मुंबई हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कारण त्या वेळी दहशतवादी समुद्रमार्गे भारतात घुसले होते. त्यामुळेच आता लष्कर-ए-तोयबा पाण्यातील लढाईसाठी तयारी करत असल्याचा दावा किती गंभीर आहे, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.





व्हिडीओमध्ये स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं सांगणारा एक व्यक्ती ‘हरीश डार’ नावानं ओळख देतो. तो सांगतो की, तरुणांना स्कुबा डायव्हिंग, पोहणे, बोटी हाताळणे आणि आपत्कालीन बचाव सराव अशा बाबींचं प्रशिक्षण दिलं जात आहे. याशिवाय ‘वॉटर फोर्स’ उभारण्याचा दावाही या व्हिडिओत करण्यात आला आहे. या दाव्यानुसार आतापर्यंत शंभराहून अधिक जणांना बोट चालवण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. हे वक्तव्य केवळ प्रचारासाठी आहे की भविष्यातील कटाचा भाग आहे, याचा शोध घेणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाची बाब म्हणजे, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेटवर्कवर कारवाई केल्यानंतर तेथून सातत्याने आक्रमक आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांचा सूर वाढलेला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणा अशा व्हिडिओंवर बारकाईने लक्ष ठेवून असून, केवळ सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास न ठेवता त्यामागची सत्यता तपासली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अशा प्रकारचे संदेश आणि प्रशिक्षणाचे दावे ही बाब हलक्यात घेण्यासारखी नसल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन

Emmanuel Macron India Visit: भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंधांचा नवा अध्याय

- मुंबईत मोदी-मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक; टाटा-एअरबस हेलिकॉप्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : भारत आणि