‘शिवसेना’ आणि धनुष्यबाण कुणाचा?

सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी


राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळा'बाबतही होणार फैसला


मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.


विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उबाठाविरोधात उघड बंड केले होते. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाला उबाठा सेनेने र्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले असून, या दोन्ही याचिकांवर आता बुधवारी एकत्र सुनावणी होणार आहे. या प्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.


‘राष्ट्रवादी’ आणि ‘घड्याळा’बाबत सुनावणी


दुसरीकडे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली असून, अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे.

Comments
Add Comment

Israel - Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने घेतला बळी

मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय

Mumbai News : वरळी नाका होणार 'ट्रॅफिक फ्री'! २ किमीचा वळसा आता संपणार, पालिकेचा मास्टरप्लॅन; २ नवीन पुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई

BMC News : प्रभाग समितीचे भाजपचे उमेदवार ठरले, नावे झाली जाहीर!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीपैकी ०९ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार

BMC : महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याची विट रचणार डि ठक्कर कंपनी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष मुंबई (विशेष

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना