भिवंडीत सत्तास्थापनेत 'राष्ट्रवादी'ची भूमिका निर्णायक

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. निवडणुकीत पहिल्यांदाच १२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असून, त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौरपदावर कोणालाही बसवणे अशक्य असल्याचे चित्र आहे. भिवंडी मनपाच्या एकूण ९० जागांसाठी निवडणूक झाली असून, सत्ता स्थापनेसाठी ४६ जागांचे बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलात कोणत्याही पक्षाकडे हे संख्याबळ नाही. काँग्रेसला ३० जागा, भाजपला २२, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना प्रत्येकी १२ जागा, समाजवादी पक्षाला ६, कोणार्क विकास आघाडीला ४, भिवंडी विकास आघाडीला ३ तर १ अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.


भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडे एकत्रित ३४ जागा असून, सत्ता स्थापनेसाठी त्यांना आणखी १२ मतांची गरज आहे. हीच संख्याबळाची किल्ली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडे असल्याने, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला किंवा तटस्थ भूमिका घेतली, तर राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात. मात्र, राष्ट्रवादी (शप) महाविकास आघाडीचा धर्म पाळणार की स्थानिक राजकीय गणितांचा विचार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी राजकीय बेरीज-वजाबाकी सुरू


महापौरपदासाठी यांची नावे चर्चेत:


भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील तसेच नारायण चौधरी यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या दोन्ही उमेदवारांचे विविध पक्षांतील नगरसेवकांशी असलेले सलोख्याचे संबंध भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे.


'कोणार्क'ची जादू पुन्हा चालणार का?


भिवंडीच्या राजकारणात कमी जागा असूनही सत्ता काबीज करण्याचा इतिहास कोणार्क विकास आघाडीचा राहिला आहे. माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कोणार्क विकास आघाडीकडे अवघ्या ४ जागा असल्या तरी, यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधील बंडखोरीच्या जोरावर आपला महापौर बसवला होता. त्यामुळे यावेळीही कोणार्क विकास आघाडी तसेच जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखालील भिवंडी विकास आघाडी (३ जागा) कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


सध्या महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा सुरू असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग येणार आहे. तोपर्यंत अंतर्गत चर्चांद्वारे आणि संभाव्य ‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सावध पावले टाकत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण