राजकीय फोडाफोडी; उबाठाचे नितीन खंबायत श्री मलंगगडच्या जंगलात ?

नऊ जण सुरक्षित; उबाठातर्फे दोन नगरसेवकांना नोटीस; कारवाईचा इशारा


कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) उबाठाचे नगरसेवक फोडण्याचे काम सुरू केले आहे. उबाठातील दोन नगरसेवक शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. फोडाफोडीपासून दूर कल्याण पू.मधील उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबायत श्री मलंगगड परिसरातील जंगलात लपून बसल्याची खळबळजनक चर्चा रंगली आहे. दरम्यान उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांनाही नोटीस दिली आहे. उद्या पक्षाच्या गट स्थापनेकच्या बैठकीस उपस्थित राहावे, अन्यथा पक्ष विरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


कडोंमपाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उबाठाच्या नगरसेविका ॲड. कीर्ती ढोणे यांनीही खा. श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने खळबळ उडाली. या घडामोडींमुळे उबाठासह भाजपमध्येही तीव्र नाराजी आहे.


कल्याणमधील शिवसेनेचे (शिंदे गट) काही मातब्बर नगरसेवक स्वतःच्या प्रभागात पराभूत झाले असताना, त्यांच्या विजयासाठी ताकद लावण्याऐवजी फोडाफोडीवर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. कल्याण पू. येथील नितीन खंबायत हे उबाठाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांना शिवसेनेत(शिंदे गट) सामील करून घेण्यासाठी दोन दिवसांपासून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप उबाठाडून होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याची चिंता करू नका, आम्ही सर्व बघून घेऊ, असे सांगण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक अभिजीत सावंत यांनी नऊ नगरसेवक सुरक्षित असल्याचा दावा करत ते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती