बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा

एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही


मुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिवसेना असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो जनादेशाच्या विरोधात असेल. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीत निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल”, अशी भूमिका शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मांडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.


दरम्यान, पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रेतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी सर्व २९ नगरसेवक आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयात जाणार होते. त्यानुसार, त्यांना सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कोकण विभागीय आयुक्तालयाचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या शपथविधीनिमित्त शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत असल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाकडे जमा


गेल्या चार दिवसांपासून वांद्रेतील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचवेळी गटनोंदणीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Monsoon BMC : मुंबईत मुसळधार पाऊस; महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

- मालाड मालवणीत ३४० तर शहरांत परळ भागांत ३३४ मिमी पाऊस मुंबई (विशेष प्रतिनिधी ) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या

Nashik Simhastha Kumbh Mela : गोदाघाट सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आठ ठिकाणी स्वतंत्र पथक; पोलिसांची राहणार करडी नजर

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि भाविक तसेच स्थानिक यांची सुरक्षा

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Nashik : गोकुळ गितेंच्या विजयात चोरट्यांनाही डाव साधला; ७ लाखांचे दागिने चोरी

Nashik : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान चोरट्यांनी

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Maharashtra Police Transfers : राज्यातील ११५ DYSP अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृह विभागाचे आदेश जारी

मुंबई : राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police - DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या