बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा

एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही


मुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिवसेना असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो जनादेशाच्या विरोधात असेल. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीत निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल”, अशी भूमिका शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मांडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.


दरम्यान, पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रेतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी सर्व २९ नगरसेवक आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयात जाणार होते. त्यानुसार, त्यांना सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कोकण विभागीय आयुक्तालयाचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या शपथविधीनिमित्त शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत असल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाकडे जमा


गेल्या चार दिवसांपासून वांद्रेतील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचवेळी गटनोंदणीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका

JEE Main 2026 Session 1 Result: जेईई मेनचा निकाल आज जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पाहू शकता अपडेट्स

JEE Main 2026 Session 1 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आज जेईई (मेन) २०२६ सत्र १ चा (JEE Main 2026 Session 1) निकाल जाहीर करणार आहे. मूळ निकाल १२

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला आहे. भारताने

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत