बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत. यावेळच्या सभागृहात १४६ मराठी नगरसेवकांसह मुंबईचा ‘मराठी बाणा’ कायम असला तरी २१ गुजराती, १७ हिंदी भाषक आणि ३२ मुस्लीम नगरसेवकांसह ७० नगरसेवक निवडून आले असून, मुंबईचे बहुभाषिक स्वरूप अधिक गडद केले आहे. मुंबईच्या राजकारणाचा कणा असलेला मराठी मतदार अद्याप निर्णायक भूमिकेत आहे. उबाठा गट, शिवसेना व भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी मराठी चेहऱ्यांना झुकते माप दिले. विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, यशवंत किल्लेदार आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी नावांसह अंकित प्रभू आणि राजुल पाटील यांसारख्या युवा/वारसदार चेहऱ्यांनी ‘मराठी टक्का’ भक्कम ठेवला आहे.


व्यापारीवर्ग व उत्तर भारतीय मतदारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. २१ गुजराती व १७ हिंदी भाषक नगरसेवकांच्या निवडीमुळे भाजप व शिवसेनेच्या गटांना दिलासा मिळाला आहे. नील सोमय्या, आकाश पुरोहित व पंकज यादव यांसारख्या उमेदवारांनी आपल्या समाजाच्या मतांचे यशस्वी ध्रुवीकरण केल्याचे दिसून येते. निवडणुकीत ३२ मुस्लीम नगरसेवक निवडून येणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना