महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड


  • मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात एवढ्या कमी कालावधीमध्ये ही निवडणूक घेणे अशक्यच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होते की सुट्टीच्या दिवशी शनिवारी ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी की ०२ फेब्रुवारी रोजी होईल याबाबत तर्क लढवले जात आहे.


मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जात असल्याने भाजपच्या दिल्लीचा हवाल देत महापौर पदाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होईल अशाप्रकारचे चित्र रंगवले जात आहे. परंतु २२ जानेवारी नंतर एकमेव शुक्रवारचा दिवस असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे याचे नोटीफिकेशन जाहीर करून त्यानुसार महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचा तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी गृहीत धरल्यास एवढ्या कमी अवधीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. खुद्द महापालिका सचिव विभागाला याबाबत कोणत्याही सूचना नाही. त्यातच सुट्ट्या येत असल्याने त्या वगळून हा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक जरी घ्यायची झाल्यास शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी घ्यावी लागेल किंवा सोमवारी २ फेब्रुवारी रोजी घ्यावी लागेल अशाप्रकारचे चित्र आहे.त्यामुळे महापौर निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर कशाप्रकारे होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

कुर्ला येथील विविध परिसरातील ७१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन

अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’

Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री

Mumbai Western Express Highway | कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग

मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई