उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी नगरसेवकांनी ५० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागांवर मराठी नगरसेवक निवडून आल्याने, आता मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे. फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याणलगतच्या ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत व खुल्या जागांवर वसवण्यात आले. उल्हास नदीमुळे शहराला ‘उल्हासनगर’ हे नाव मिळाले. आजही येथे सिंधी समाजाचा प्रभाव दिसून येतो. अनेक सिंधी कुटुंबे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आदी शहरांकडे स्थलांतरित होत असताना मराठी व उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढली आहे.


महापालिका निवडणुकीत ७८ पैकी ३९ म्हणजे ५० टक्के मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. सिंधी समाजाचे २९ (३७ टक्के) नगरसेवक असून, शीख तसेच उत्तर भारतीय–बंगाली समाजाचे प्रत्येकी ५ नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) व ओमी टीमने एकूण ३६ जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी २२ मराठी, ८ सिंधी, ४ शीख आणि उर्वरित उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत.
भाजपच्या ३७ नगरसेवकांपैकी २० सिंधी समाजाचे, १३ मराठी, १ शीख आणि ३ उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत. तर अन्य ५ जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे २, काँग्रेसचा १ आणि अपक्ष १ असे चार नगरसेवक मराठी समाजाचे असून, साई पक्षाचा १ नगरसेवक सिंधी समाजाचा आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे